कोऽहम ते सोहम: मी तत्त्वतः कोण आहे याचा शोध घेणं हे अध्यात्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपण जेव्हा स्वतःला 'मी' म्हणतो तेव्हा आपल्याला आपले व्यक्तित्व अर्थात आपले नाव, गाव, जात, धर्म, स्वभाव, हुद्दा, इ. अभिप्रेत असतं आणि व्यावहारिक स्तरावर ते बरोबर देखील आहे. पण हाच प्रश्न जेव्हा आपण अध्यात्माच्या स्तरावरून विचारतो तेव्हा त्याला तो आपल्या स्वतःशी अभिप्रेत नसतो तर तो आपल्या स्वतःच्या गाभ्याशी जे आत्मिक तत्त्व आहे त्याच्याशी असतो... आणि त्या तत्त्वाविषयी जागरुक होणं है अध्यात्माचं प्रयोजन आहे. जी व्यक्ती या तत्त्वाविषयी जागरुक होते तीचं जीवन अंतबह्यि विकसित होऊन जातं. या तत्त्वाविषयी वाचकाला जागरुक करणं ह�... See more
कोऽहम ते सोहम: मी तत्त्वतः कोण आहे याचा शोध घेणं हे अध्यात्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपण जेव्हा स्वतःला 'मी' म्हणतो तेव्हा आपल्याला आपले व्यक्तित्व अर्थात आपले नाव, गाव, जात, धर्म, स्वभाव, हुद्दा, इ. अभिप्रेत असतं आणि व्यावहारिक स्तरावर ते बरोबर देखील आहे. पण हाच प्रश्न जेव्हा आपण अध्यात्माच्या स्तरावरून विचारतो तेव्हा त्याला तो आपल्या स्वतःशी अभिप्रेत नसतो तर तो आपल्या स्वतःच्या गाभ्याशी जे आत्मिक तत्त्व आहे त्याच्याशी असतो... आणि त्या तत्त्वाविषयी जागरुक होणं है अध्यात्माचं प्रयोजन आहे. जी व्यक्ती या तत्त्वाविषयी जागरुक होते तीचं जीवन अंतबह्यि विकसित होऊन जातं. या तत्त्वाविषयी वाचकाला जागरुक करणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक वाचकाला अलगदपणे त्याच्या आत्मिक गाभ्यापर्यंत घेऊन जाईल आणि.... 'कोऽहम' म्हणजे 'मी कोण आहे' पासून ते "सोहम" म्हणजे "मी ते आत्मिक तत्व आहे याचं दर्शन घडवेल आणि असं जर होऊ शकलं तर त्याला सर्वार्थानं जीवनमुक्त होण्याची अनुभती लाभेल. आनंदयोग : मी अनेक वर्षे एका मनोविकासकाची भूमिका निभावली त्यामुळे मला लोकांना फार जवळून न्याहाळता आलं. या काळामध्ये मला असं जाणवलं की अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्रस्त आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि एकूणच त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा अभाव आहे. हा आनंदाचा अभाव त्यांच्यावर आव्हानांचे डोंगर कोसळले होते म्हणून नव्हता, तर त्यांना जीवनाचा खेळ खऱ्या अर्थाने खेळता येत नव्हता म्हणून होता. जीवनाचा हा खेळ जर बुद्धीनं खेळता आला तर जीवन कितीतरी पटीनं सुखमय, स्वस्त, समाधानी आणि आनंदी होऊ शकतं. माझ्या जीवनामध्ये मला हेच समजलं आणि म्हणुनच मी एक समाधानी, स्वस्थ, सुखमय आणि आनंदी जीवन जगू शकलो. नेमकं मला काय समजलं ते मी या पुस्तकात मांडण्याचा प्रयन केला आहे. हे वाचून तुमच्याही जीवनामध्ये आनंदयोग घडून येऊ ही इच्छा